Pik Vima : शेतकरी मित्रांनो पिक विमा योजना सन 2005-06 सालापासून सुरू झालेली आहे. व सन 2021-22 या सालापर्यंत याच्यामध्ये सुमारे 61 हजार पेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. व 41 हजार पेक्षा जास्त प्रस्ताव सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील वर्षी जे नुकसान झालेले होते त्या नुकसाना बद्दल तेथे 216 प्रस्ताव सरकारकडे प्राप्त झालेले होते.
याच्यामध्ये एकूण 122 लोकांची नावे मंजूर सरकारकडून करण्यात आलेले आहेत. पिक विमा कंपनीकडे अजून दोन प्रस्ताव प्रलंबित राहिलेले आहेत. प्रस्ताव मध्ये जर कागदपत्राची पूर्तता नसेल तर संबंधित जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे आदेश पाठवलेले आहेत. या मध्ये स्थिती चेक करून प्रस्ताव तत्काळ मंजूर कसा करता येईल याच्याकडे सध्या लक्ष लागलेले आहे.
महाराष्ट्रातील सर्व पिक विमा कंपनीने मागील वर्षी ची परिस्थिती बघितली तर त्या कंपन्यांनी जीएफ 6000 अर्ज पीक विमा कंपन्यांकडे प्राप्त झालेले होते. त्यापैकी पिक विमा कंपन्याने 552 अर्ज मंजूर केलेले आहेत. सदस्य 88 कोटी 37 लाख इतके आहेत वाटप नुकसान भरपाई 69 कोटी 79 लाख रुपये दिलेली आहे. सरकारने पिक विमा कंपनीला सांगितले आहे की जुने प्रस्ताव जोपर्यंत आपण मंजूर करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही पुढच्या विम्यासाठी सरकारकडून पात्र ठरले जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी या वर्षी पिक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांची पिक विम्याची 25 टक्के रक्कम आता सरकारने जमा केलेली आहे. Pik Vima
महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील झालेले आहेत व काही शेतकऱ्यांच्या खात्यात आणखीन पर्यंत पैसे जमा झालेले नाहीत शेतकरी मित्रांनो काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही कारण या आठवड्यामध्ये पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. पिक विमा योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र मध्ये भेट द्या.